SUPER- 8 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाशी होणार सामना

MEDIA CONTROL NEWS

विश्वचषक २०२४ च्या २५ व्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करून सुपर- 8 साठी पात्रता मिळवली आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला आहे. या विजयासह टीम इंडियाने सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना निश्चित केला आहे. मात्र, भारतीय संघ सुपर-८ चा शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळेल (IND vs AUS). त्याआधी रोहित ब्रिगेड सुपर-8 मध्ये आणखी दोन सामने खेळणार आहे.२०२४ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होत आहेत. ज्यांची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील. टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये आहे. अ गटातील टीम इंडिया सुपर-८ चा पहिला सामना क गटातील पहिल्या क्रमांकाच्या संघासोबत खेळेल आणि त्यानंतर मेन इन ब्लूचा दुसरा सामना ड गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. त्यानंतर सुपर-८ मध्ये टीम इंडिया आपला शेवटचा सामना २४ जून रोजी सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *