कोल्हापूर : कोल्हापुरातील मागील पावसाचा अंदाज तसेच मागील महापुराचे दृश्य लक्षात घेता, यावर्षी कोल्हापुरात महापूर येऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीपात्रात जी अनधिकृत बांधकामे आहेत, ती बांधकामे पाडण्यासाठी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची गरज नाही, असे असताना देखील शासनाने कोणतीच पावले न उचलल्याने पूर परिषदेच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या सहकार्याने ही बांधकामे पाडली जातील असा, इशारा जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी दिला आहे.med
पूर परिस्थिती येऊ नये, यासाठी गेल्या तीन वर्षापासून शासनाला जाणीव करून देण्यासाठी पूर परिषदेचे आयोजन केले जाते, यंदा देखील ‘आंदोलन अंकुश’, कृष्णा महापौर नियंत्रण कृती समिती व स्पंदन प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीने तिसरी पूर परिषद संपन्न झाली.
या पूरपरिषदेत बोलत असताना परिषदेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेला हा लढा जनतेची पुरापासून सुटका करण्यासाठी आहे’, त्यामुळे संपूर्ण पुरमुक्त होईपर्यंत पूरग्रस्तांच्या सहकाऱ्याने हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.