Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : एच.आय.व्ही संसर्गितांना आज ए.आर.टी औषधे ही संजीवनी आहे .ज्यांचा एकही चुकलेला डोस एच.आय.व्ही सह जगणार्या रुग्णांची जीवनरेषा कमी करू शकतो, शिवाय प्रतिकारशक्ती आणखी खालावली तर कोरोनासारख्या विषाणूचा हल्ला होऊ शकतो.
संचारबंदीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एच.आय.व्ही रुग्णांपर्यंत औषधे पोहोचणार कशी? हा यक्षप्रश्न होता.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने हे आव्हान पेलायचे ठरवले. यासाठी तालुका स्तरावरील सेवा संस्थापर्यंत हे औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
ए. आर.टी. केंद्र, आय.सी.टी.सी. केंद्र, डी.एस.आर.सी.केंद्र, रक्तपेढी येथील वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, समुपदेशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ असा सुमारे शंभर जणांचा ताफा रुग्णांना औषधे पोहोचण्याचा चंग बांधून कामाला लागला.
एच आय व्ही संसर्गित व्यक्ती शारीरिक हानीबरोबरच कलंक आणि भेदभाव यांच्या भीतीखाली वावरत असते. आपल्या जिल्ह्यातील नव्हे, तर जिल्हा व राज्यबाह्य व्यक्ती एच.आय.व्ही सह जगणारे मजूर , व्यक्ती जे कोल्हापूर जिल्ह्याला एकूण अडकून राहिले आहेत,त्यांनाही डाटा नेटवर्किंगच्या साहाय्याने पडताळणी करून पाच हजार पेक्षा जास्त रुग्णांना औषधे पोच करण्यात आली.
कोरोना तपासणी, उपचार म्हटले तरी अनेकांची भीतीने गाळण उडत असताना एड्स नियंत्रण पथकाचे लढवय्ये कर्मचारी ,जीवाची पर्वा न करता हिरीरीने पुढाकार घेऊन सामील झाले.
प्रभावी कामाकरता या पथकाला राज्य पातळीवर गौरवण्यात गेले आहे.
तरीही १८ वर्षांहून अधिक वर्ष कंत्राटी स्वरूपात प्रामाणिकपणे काम करूनही नोकरीत कायमस्वरूपी करण्याबाबत दखल घेतली नाही ,याची कर्मचारीवर्गात खंत आहे.
.