Getting your Trinity Audio player ready...
|
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६३.९१ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील-इचलकरंजी हा १ बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३३.१३ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ६०.७८० इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४२.६७ दलघमी, वारणा ३९९.३२ दलघमी, दूधगंगा २७४.५८ दलघमी, कासारी ३०.७६ दलघमी, कडवी २८.७० दलघमी, कुंभी ३१.५८ दलघमी, पाटगाव ३५.६८ दलघमी, चिकोत्रा १६.६८ दलघमी, चित्री १४.६६ दलघमी, जंगमहट्टी ८.५४ दलघमी, घटप्रभा ४३.९५ दलघमी, जांबरे १२.३६ दलघमी, कोदे (ल पा) ४.९४ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १३ फूट, सुर्वे १४.८ फूट, रुई ४१.६ फूट, इचलकरंजी ३७.६ फूट, तेरवाड ३६.३ फूट, शिरोळ २९.३ फूट, नृसिंहवाडी २२ फूट, राजापूर १२.९ फूट तर नजीकच्या सांगली ७ फूट व अंकली ६.७ फूट अशी आहे.
जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ३ मिमी व चंदगड तालुक्यात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तर हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड व आजरा या तालुक्यात पाऊस निरंक आहे.