महानगरपालिकेला खड्ड्यात घालणाऱ्या घनकचरा प्रकल्पाला मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने यापुढेही विरोधच : जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 39 Second

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : घनकचरा प्रकल्प लोकप्रतिनिधींनी रद्द करावा, असे पत्र महापालिका प्रशासनाला दिले आहे. महापालिकेचे वाटोळे करणारा प्रकल्प महापालिका प्रशासनाने रद्द केला आहे. अथवा नाही याचा खुलासा प्रशासनाने केला नाही. तरी मनपा प्रशासनाने याचा खुलासा करून जनतेच्या मनातील शंका दूर करावी.

आमदार-खासदारांनी प्रशासनाला विरोध केलेले पत्र दिलेले आहे. असे असले तरी, हा नुसता देखावा न करता तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून याच्या मुळापर्यंत जाऊन तोट्याचा हा घनकचरा प्रकल्प रद्द होईपर्यंत याचा पाठपुरावा करण्यात यावा तरच खऱ्या अर्थाने आपण जनतेचे लोकप्रतिनिधी आहात, असे जनतेच्या लक्षात येईल.

या घनकचरा प्रकल्पाच्या विरोधात वेगवेगळ्या संघटनांनी मोठा आवाज उठवल्यामुळे लोकप्रतिनिधींनी मनपा प्रशासनावर दबाव आणला. व या दबावापोटी घनकचरा प्रकल्पाला विरोध करणे भाग पडले. यामध्ये सिंहाचा वाटा अभ्यासू पत्रकारांनाही जातो.

तसेच हा प्रकल्प पूर्णपणे रद्द केला असे प्रशासनाने जाहीर केलेले नाही, त्यामुळे काही ठराविक स्वार्थी आपमतलबी पदाधिकारी व अधिकारी छोटे मोठे बदल करून त्यांच्या स्वार्थापोटी हा प्रकल्प पुन्हा रेटण्याची दाट शक्यता आहे.

सन्माननीय आमदार व खासदार यांनी मनपाचे हित बघून यावर काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. घनकचरा प्रकल्प जनतेच्या हिताचा व मनपाच्या फायद्याचा कसा करता येईल, यासाठी तज्ञ लोकांच्या कडून मार्गदर्शन घेण्यात यावे. महापालिकेच्या तोट्याच्या घनकचरा प्रकल्पाला मा. मदन भाऊ पाटील युवा मंच कडून यापुढेही विरोध करण्यात येईल. याची लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा मा. मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी दिला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *