कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांपर्यंत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी, भाजपाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 49 Second

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोल्हापूर मधील कोरोनाची व्याप्ती आणि परिस्थिती अत्यंत भयावह बनली असून केवळ आठवड्याभरातच रुग्णांची संख्या कोल्हापूर शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगून रुग्णाला अत्यंत गंभीर परिस्थिती असतानासुद्धा परत पाठवले जात आहे ही प्रशासनाची निष्क्रियता असून यावरून कोल्हापूरातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली असल्याचे दिसून येते. असे भारतीय जनता पार्टीने पत्रकाद्वारे म्हंटले आहे.

 मागील चार दिवसांमध्ये जिल्ह्यात सुमारे बाराशे ते तेराशे नव्या रुग्णांची भर पडली यामध्ये शहरातील चारशे रुग्णांचा समावेश आहे. त्या तुलनेत उपचारासाठी बेडची संख्या वाढवणे अपेक्षित होतेे, मात्र प्रशासन ही यंत्रणा उभी करण्यात अपयशी ठरलेले दिसते.

 काल कोल्हापूर शहरांमधील तीन रुग्णांना केवळ हॉस्पिटल मध्ये अँडमिट न केल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

तसेच कोल्हापूरातील विविध ठिकाणी कोविड केअर सेंटरवरही अनास्था असल्याचे दिसून येते, या विषयांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता प्रशासनाला मदत होईल , अशा पद्धतीची भूमिका कायम राहिली आहे आणि यापुढे देखील राहील. मात्र वेळोवेळी प्रशासनाला मदतीचा हात दिला असता प्रशासने तो झिडकारला आहे.

तसेच कोल्हापूर सारख्या छत्रपती शाहू राजांच्या या नगरीमध्ये कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग होणे , यासारखी घटना  कोल्हापूरच्या लौकिकास काळीमा फासणारी, निंदनीय आहे. अशी घटना घडलीच कशी ? तसेच दुसऱ्या बाजूला अगतिक रुग्ण काही खाजगी हॉस्पिटलचा दरवाजा ठोठावतात तेव्हा पॅकेजच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट सुरू असून , प्रशासनाचा यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

 

कोविड केअर सेंटरमध्ये पुरवण्यात येणाऱ्या फूड पॅकेटमध्ये आळ्या सापडल्याने , या प्रकाराची करावी तितकी निंदा कमीच आहे. त्याचबरोबर कोविड केअर सेंटरमध्ये जे फूड पॅकेट पुरवणाऱ्या ठेकेदारांची बिले देखील या प्रशासनाने थकविल्याचे आढळून येते.

ज्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये आवाच्या सव्वा बिले आकारण्यात आली आहेत , त्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात लेखी तक्रारीद्वारे संपर्क साधावा, असेही पत्रकाद्वारे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *