Getting your Trinity Audio player ready...
|
आज लिहिण्याची गरज पडली आहे.
की सध्या सर्व जगावर कोरोना सारख्या भयंकर आजारा चे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व जगावर घरातच राहण्याची वेळ आली आहे,
आपन दैनंदिन जी कामे करत होतो ते काम या आजाराने कित्येक जणांचे हिरावून घेतले आहे,
प्रत्येकावर आर्थिक संकट पण आले यांची खंत आम्हाला पण आहे.
आपल्या देशात कोव्हिडं 19 ला रोखण्यासाठी देशात लॉकडॉन घेण्यात आले यामुळे आपल्या घरातील सर्वजण घरातच होतो.
याकाळात महावितरण कंपनीने आपल्याला घरात राहण्यासाठी सर्वातमोठे सहकार्य केले आहे ,
महावितरण कंपनीने आपला वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवला त्यामुळे आपल्या घरातील विजेवर चालणारी सर्व उपकरणे हाताळण्यासाठी कुठलीही अडचण आपल्याला आली नाही.
याकाळात महावितरण च्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी कोरोना सारख्या भयानक आजारात स्वतःचा जीव मुठीत धरून वीजपुरवठा अखंडित चालू ठेवला. व आजतागायत कोरोणा आजाराची परिस्थिती आटोक्यात आली नाही याकाळात पण महावितरण आपल्या सेवेत वीजपुरवठा अखंडित देत आहे,
मला आपल्या ग्राहकांना प्रश्न विचारायचा आपण महावितरण च्या अधिकारी/कर्मचारी यांचे कधी आभार मानले का
जे आपल्याला सतत उजेडात ठेवण्यासाठी अहोरात्र काम करतात त्यांच्या बद्दल आपुलकी आपल्या का वाटत नाही
महावितरण अधिकारी/कर्मचारी हे माणुस आहेत की एखादी मशीन की जी सतत ताजी तवानी राहते,
त्यांना काम करून थकवा येत नाही
जसे आपल्याला कुटंब आहे तसे महावितरण च्या अधिकारी/कर्मचारी यांना नाही का
आपल्यातील कितीजण महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्यावर सुरळीत होण्यासाठी मदत करतात याचा आपल्या मनाला प्रश्न विचारले का
आपले वीज बिल आपण वेळेत भरून महावितरण ला सहकार्य करतो का वीज बिल नियमीत भरणे आपली सामाजिक जबाबदारी नाही का
वीज तयार करण्यासाठी व आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी खर्च लागत नाही का
वीज वाहिन्यां खराब होत नाहीत का
आपल्या घरातील उपकणे खराब होतात ते दुरुस्ती केल्यानंतरच उपकरणे चालू होतात न!
मग आपल्या घरापर्यंत वीज पुरवठा येण्यासाठी 33kv उपकेंद्र पासून आपले घर किती अंतरावर आहे याचे आपण लक्ष्यात आले असेल,
33kv उपकेंद्रावर साधारणता 15 ते 20 गावाचा वीजपुरवठा असतो त्या गावांचे अंतर साधारण 15 ते 20 km पर्यंत असते,
प्रत्येक लाईनंमन कडे 4 ते 6 गावे आहेत बरोबर एका गावठाण फिडर वर 15 ते 20 गावे आहेत घरगुती चे सरासरी प्रत्येक गावात 250×20=5000 ग्राहक असतात,
प्रत्येक गावात गावठाण व शेतीला मिळून साधारण 40 डीपी (रोहित्र)असतात 40×20=800 डीपी (रोहित्र) व आपल्याला वीज वाहिनी चा विस्तार उपकेंद्रा पासून 20km असून प्रत्येक गावातील शेत शिवारात 5km अंतरावर पसरलेली आपली वीज वाहिनी 20×5=100km अंतर आहे
येवढ्या मोठ्या विस्तार असलेल्या आपल्याला वीज वाहिनी वर फॉल्ट होणार की नाही याची तुम्हीच स्वतःच्या अंतःकरणाला प्रश्न विचारा
आपल्या उपकेंद्रा मध्ये व लाईनमनचा जो भ्रमणध्वनी आहे यांना येवढ्या मोठ्या वाहिनी वर वीजपुरवठा चालू असताने काही फॉल्ट झाल्यास त्या परिसराची माहिती मिळण्यासाठी व कुठं अचानक कोणी वीज पुरवठाच्या सानिध्यात अचानक जीवित प्राणी आला असेल त्यांना त्या अपघातात वाचवण्यासाठी आपल्याला उपकेंद्रा चा लाईनमनचा भ्रमणध्वनी क्रमांक ग्राहकांना दिला जातो
यांची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. पण हल्ली ग्राहकांना सवय झाली आहे की आपलं वीज पुरवठा खंडित झाला की लगेच स्वतःचा भ्रमणध्वनी खिशातुन काढला की उपकेंद्रा च्या व लाईनमन च्या भ्रमणध्वनी वर कॉल सुरू प्रश्न विचारणे सुरू वीज पुरवठा बंद कशामुळे झाला
काय कामकराचे वीजपुरवठा बंद का केला
परमिट कुणाचे आहे का परमिट दिले फॉल्ट झालाच कसा तुम्ही कामच काय करता
वीज पुरवठा दिवसातून कितीदा बंद करता वीज पुरवठा किती वेळ लागेल सुरळीत होण्यासाठी इतका वेळ लागतेच कसा
आम्ही आताचा जेवण करायला बसलो होतो वीज तुम्ही पुरवठा बंद केला आम्हाला मच्छर चावत आहेत माझी तबेत बरी नाहीमाझे काम थांबलंय वीजपुरवठा लवकर सुरू करा असे अनेक प्रश्न करून लाईनमन व उपकेंद्रातील कर्मचारी यांना परेशान करण्याचे काम काही ग्राहक करत असतात.
आपल्या अश्या अनआवश्यक कॉल मूळे आवश्यक असरणारा कॉल लाईनमन व यंत्रचालक याना उचलता येत नाही.
कॉल करण्यात जबादारी लोकप्रतिनिधी ही अपवादच
मी ग्राहकांना विचारत आहे की इतके प्रश्न निर्माण करण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला
की तुम्ही वीज पुरवठा बंद झाला की कॉल करून लाईनमन व उपकेंद्र तील ऑपरेट ला विचारण्याचा
लाईनमन वीज वाहिनी वर काम करत असतात आपण फोन करून त्याना सल्ले देतो की ज्या भागात काम करता तेवढा च भाग बंद करून काम करा
यांचा अधिकार तुम्हाला कुणी दिला हो.
लाईनमन यांना वीज वाहिनीवर काही काम करण्याचे ज्ञान नाही का वीज पुरवठा बंद केला असेल तर लाईनमन कुठंला तरी भागातील बंद पडलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीच उपकेंद्रातून वीज पुरवठा बंद करून घेतला असेलन व काम करण्यासाठी वेळ तर लागणार आहे
याचे भान ग्राहकांना असायला हवे चालू लाईनवर काम करतात येत नाही
याची खात्री ग्राहकांना सुध्दा आहे आपण आपल्या घरातील ब्लप लावण्यासाठी पण वीज बोर्डा वरील ब्लपचे बटणं बंद करूनच लावतो.मग लाईनमन येवढ्या मोठा विस्तार असलेल्या वीज वाहिनीवर काम करण्यासाठी वीज पुरवठा बंद करून काम करत आहे आपल्यासाठीचजीव धोक्यात घालून काम करत असतात,
कामात असताना आपण विनाकारण त्यांना फोन करून मानसीक त्रास का देतअसतो तुमच्या हा प्रश्नना ची उत्तर देण्यासाठी लाईनमन बांधील नाही. तुम्हाला मनातुन वाटत नाही का वीज पुरवठा बंद झालेला सुरळीत करण्यासाठी कर्मचारी यांनी तणावमुक्त स्थिती मध्ये काम करावे
कोणताही विना अपघात वीज पुरवठा सुरळीत चालू राहावा आपल्या अशाच अति घाईच्या प्रश्नाने कर्मचारी याचे मानसिक संतुलन बिघडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं जीव गमावून अपघातात पण होण्याची शक्यता आहे
याला जबाबदार कोण असेल याचे उत्तर तुम्ही तुमच्या मनाला अगोदर विचारा व नंतरच स्वतःचा भ्रमणध्वनी
लाईनमन व उपकेंद्रातील क्रमांक लावण्यासाठी काढावा ही नम्र विनंती.
वीज पुरवठा खंडित झाला तर अर्ध्या ते तासभर वाट पाहण्याची मानसिकता आपली तयारी नाही ही कीती मोठी शोकांतिका आहे,
वीज पुरवठा बंद झाला की लगेच कॉल करून विचारणे टाळा व खरच आपल्या डोळ्यांसमोर कुठं फॉल्ट होत असेल तर कॉल करून सांगण्याची सवय पण ठेवा कारण या सवयी मुळे आपला वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत होण्यास मदत मिळेल.
आपण ह्या सर्व गोष्टी चा काळजीपूर्वक विचार करून च आपण पण महावितरण कंपनीच्या अधीकारी व कर्मचारी यांना कॉलस कमी जातील यांची मनातून काळजी घेतली तरच आपला वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचारी यांना वेळ मिळेल,
यांची मनातुन दक्षता घ्यावी व विना आवश्यक महावितरण च्या लाईनमन व उपकेंद्रा मध्ये फोन करून त्रास देने बंद करावे,
तसे आपण सुज्ञ सुशिक्षित व समजूतदार आहात यात कुठलीच शंका नाही..
आम्ही आपल्याला सदैव वीज पुरवठा अखंडित देण्यासाठी तत्पर आहोतच..
आम्ही पण आपल्या कडून सहकार्याची भावना ठेवतो !
लेखक महेश सुतार
लायमन/यंत्रचालक
भ्रमणध्वनी : 98 23 65 39 97
Khup chan lihale aahe
आज जाणीव झाली खर्या वायरमन ची तुम्ही खूप प्रामाणिक पणे काम करत असता. पण सामान्य नागरिकांना त्याचे काहिंघेने देणे नसते