Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : सोमवार २७ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत प्रतिबंधित आदेशाची मुदत वाढविण्यात येत असली तरी, यामध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे.
व्यापारी आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहतील.परंतु, सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांच्या आस्थापने -तील कर्मचारी प्रती दिन जास्तीत जास्त ५०% पर्यंत पाळी-पाळीने उपस्थित असतील असे नियोजन करावे. त्याच प्रमाणे सूट दिलेल्या सर्व बाबींच्या सेवा व आस्थापना, दुकाने, उद्योगधंदे, व्यापार इ. ठिकाणी आस्थापना मालक, कर्मचारी किंवा ग्राहक म्हणून ६० वर्षे किंवा वरील व्यक्तींना वावर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
हे सुरू राहणार ………
अ) अत्यावश्यक सेवा व आस्थापना.
१) सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, हॉस्पीटल संलग्न सेवा देणाऱ्या आस्थापना.
२) सर्व बँक, बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA), इन्शुरन्स ऑफिस, वित्त पुरवठा आस्थापना, पोस्ट ऑफिस, पेट्रोल / डिझेल पंप सुरु राहतील.
३) मा. न्यायालये व अत्यावश्यक सेवेतील राज्य व केंद्र सरकारी कार्यालये कमीत कमी अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.
४) दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंटमिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील.
५) सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, ॲम्ब्युलन्स व इतर वैद्यकीय बाबींशी संबंधीत व्यक्तींचा प्रवास व वाहतुकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
६) वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील.
ब) जीवनावश्यक सेवा व आस्थापना.
१) दूध संकलन व वाहतूक सुरु राहील. (वेळेची मर्यादा नाही).
२) किरकोळ दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण, भाजीपाला व फळे विक्री सकाळी ६ ते साय.६ वा. पर्यंत सुरु राहील.
३) व्यापारी आस्थापना सकाळी ९ वा. ते सायंकाळी ६ वा पर्यंत सुरु राहतील. परंतु सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे आस्थापनेतील कर्मचारी प्रती दिन जास्तीत जास्त ५०% पर्यंत पाळी-पाळीने उपस्थित असतील असे नियोजन करावे.
मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील किराणा-धान्य विक्री व अत्यावश्यक वस्तु विक्री व सेवा सुरु राहतील.
४) एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱ्या आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत.सुरु राहतील.
५) ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना व सेवा सुरु राहतील.
६) दुरध्वनी, इंटरनेट व बँक एटीएम संबंधीत आस्थापना सुरु राहतील
७) शिव भोजन योजना व वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-१९ करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरण / विलगीकरणा साठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती सूरु राहतील. त्याच प्रमाणे ज्या लॉजेस किंवा निवारागृहामध्ये सध्या प्रवासी / कर्मचारी वास्तव्यास आहेत, त्यांचेसाठी अशी लॉजेस व निवारागृहे व त्यातील खाद्यगृहे अशा प्रवाशांपुरत्या मर्यादित स्वरुपात सुरु राहतील.
क) उद्योगधंदे
१) कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागातील सर्व उद्योगधंदे ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.
२) ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खासगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.
अशा आस्थापनांनी त्यांची कर्मचारी क्षमता प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.मं. / जिल्हा उद्योग अधिकारी (DIC) / सहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावी. या आस्थापनेमधील सर्व अधिकारी / कर्मचारी /कामगार यांनी त्यांचे ओळखपत्र व उद्योग विभागातील संबंधीत अधिकारी यांनी प्रमाणित केलेले आस्थापनेचे पत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
ड) ग्रामीण भागातील शेतीची कामे.
इ) इतर
१) अंत्यसंस्कार / अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त १० नातेवाईक / नागरिक यांना हजर राहता येईल. मृत व्यक्तींच्या नजीकच्या व्यक्तींचे सांत्वन शक्यतो दूरध्वनीवर करण्याबाबत सुचित करण्यात येत आहे.
२) माल वाहतूक.
३) शैक्षणिक संस्थांची फक्त शिक्षणेत्तर / कार्यालयीन कामे कमीत कमी कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत सुरु राहतील.
ई) प्रवासी वाहने
दुचाकी (फक्त चालक), चार चाकी वाहने (चालक + दोन प्रवासी) व शहरांतर्गत ऑटो रिक्षा (चालक + दोन प्रवासी)
हे बंदच राहणार…
शॉपिंग मॉल्स,मार्केट, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, केश कर्तनालये, स्पा,ब्युटी पार्लर
हॉटेल,रेस्टॉरंट, लॉजिंग (क्वांरनटाईनसाठी तसेच वंदे मातरम योजनेंतर्गत घेतलेली हॉटेल, लॉज वगळता)
विवाह, साखरपुडा, मुंज, वाढदिवस आदी तसेच सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रम
सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक कामे वगळता संचारबंदी राहणार.
दुकाने तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये ६० वर्षावरील मालक, ग्राहक किंवा कर्मचारी म्हणून बाहेर पडता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बंदी आदेशातुन सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापना -मध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर इ. बंधने पाळणे आवश्यक आहे.
व्यापारी आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहतील.परंतु, सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांच्या आस्थापने -तील कर्मचारी प्रती दिन जास्तीत जास्त ५०% पर्यंत पाळी-पाळीने उपस्थित असतील असे नियोजन करावे. त्याच प्रमाणे सूट दिलेल्या सर्व बाबींच्या सेवा व आस्थापना, दुकाने, उद्योगधंदे, व्यापार इ. ठिकाणी आस्थापना मालक, कर्मचारी किंवा ग्राहक म्हणून ६० वर्षे किंवा वरील व्यक्तींना वावर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.