Getting your Trinity Audio player ready...
|
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !
……………………………………..
लेखक- श्री तानाजी सखाराम कांबळे.
……………………………………….
दुखावलेली मने आणि ते सांभाळता सांभाळता झालेला मनस्ताप हा मानसाला,नक्की कोणते सुखाचे दिवस दाखवणारा असतो हेच समजून येत नाही.
आयुष्याचे अनेक टक्केटोणपे,खाच खळगा,
पाय वाटा, रानोमाळी तुडवत तुडवत जाताना,मनाच्या झालेल्या वेदना हिरव्यागार डोंगर रांगांच्या कुशीत वसलेल्या त्या,
झाडांना देखील आपण सांगू शकत नाही.
मग त्या वेदना घेऊन किती दिवस चालत बसायचं हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.डोळ्यातून ओथंबणारे अश्रू आणि त्याला न मिळणारी वाट,मुकेपणाने फोडला जाणारा हंबरडा, काळजाच्या एका कोपऱ्यात दडवलेले ते असत्य,
वास्तवाला जेव्हा हळूवार स्पर्श करते तेव्हा,या छळवादी जीवनाचा,जगण्याचा आणि इथल्या माणुसकीचा,कंटाळा आल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.
जेव्हा विश्वासाचे अधिक दूर होतात तेव्हा त्यापाठोपाठ गुंतलेली नाती,स्वार्थाने बरबटलेल्या या जगातील बाह्य आकर्षणाचे केंद्रबिंदू बनतात.तेव्हा अशांना त्यांचा टिकाव लागताना होणारी दमछाक,छळवादी जगण्याला पुष्टी देत असते.
अशावेळी जेव्हा एकटेपणाचा आभास निर्माण होतो त्यावेळी, होणारा मनाचा छळवाद हा जगण्यापेक्षा काही पटीने अधिक,किमान मरणाने सुटका झाल्यावर तरी,
आत्मीय समाधान मिळेल.निदान अशी एखादी साधी खोटी अपेक्षा तरी ठेवण्यास काय हरकत आहे.या पाझरलेल्या मनातील दोन-दोन गळणारे अश्रू कुणासाठी?
सांगत आहेत हा प्रश्न “छळवादी” जगण्याला नामोहरण करून सोडतो.
अक्षरशःनामोहरम करून सोडतो.
मनाच्या कोपऱ्यात जेव्हा एखाद्या अशीच अपेक्षा,
ठेवून तिच्या पल्लवीत झालेल्या आशा,अपेक्षा, आकांक्षा,धुळीस मिळतात तेव्हा,या छळवादी जगण्याच्या जखमेवरती मीठ सोडणाऱ्या ठरतात.
आणि मग सहज मनात एक असं काहूर माजत की,
अश्रूंचा बांध फुटावा मेल्यावरती!
मनाचा कोपरा बंदिस्त व्हावा,
सरणावर च्या गोळा केलेल्या राखे सारखा!या माझ्या जाळलेल्या हाडामासाचा बरोबर,ती,छळवादी नाती ही लुप्त व्हावीत जगता जगता जगण्याने छळले होते
मरणाने केली सुटका याकरता म्हणून !
………………………………………..