Getting your Trinity Audio player ready...
|
१३ गावे ही शहरा लगतची असून या गावांची लोकसंख्या ही मोठी असून या गावांना पाण्यासाठी कोणतीही दुसरी पर्यायी व्यवस्था नाही. या गावांचा पाणीपुरवठा तोडल्यास जनतेमध्ये प्रचंड असंतोष उफाळून येईल व जनतेबरोबर शिवसेना आपल्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला.
गांधीनगर प्रादेशिक नळ-पाणी योजना अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या थकबाकीचे कारण पुढे करून पाणीपुरवठा तोडू नये. संबंधित ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन त्यांच्या येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात यावी. थकबाकीसाठी पाणीपुरवठा खंडित नोटीस काढण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणे क्रमप्राप्त होते पण तसे आपल्याकडून झालेले नाही ही बाब गंभीर आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन विचारविनिमय करून तोडगा पुढे येईल, तो पाणीपुरवठा मंत्री मा.गुलाबराव पाटील यांचे कडे सादर करावा मा.मंत्री महोदयांना भेटण्यासाठी संयुक्त शिष्टमंडळ नेमण्यात यावे. शिष्टमंडळाने मा.मंत्री महोदय यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडाव्यात. अशा मार्गाने थकबाकीचा मार्ग निघू शकतो पण त्यासाठी योग्य मार्गाने जाण्याची नितांत गरज आहे. 13 गावांचा पाणीपुरवठा तोडणे हा त्यावर उपाय नाही. गांधीनगर, उंचगाव, गडमुडशिंगी, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरी वाडी, नेर्ली, तामगाव, मोरेवाडी, आर के नगर, पाचगाव ही गावे शहराच्या लगतची गावे असून या गावांची लोकसंख्या मोठी असून, अशा गावांचा पाणीपुरवठा तोडला तर अशा गावांना पाण्यासाठी कोणतीही दुसरी पर्यायी व्यवस्था नाही. या बाबतचे निवेदन जिल्हाप्रमुख संजय पवार व करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता जे.डी.काटकर व शाखा अभियंता लोकरे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना विस्तारक हर्षल सुर्वे, तालुकाप्रमुख विनोद खोत, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, सरदार तिप्पे, अरुण अब्दागिरी, भगवान कदम, दीपक पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख पूजा शिंदे, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, युवासेनेचे विनायक जाधव, संतोष चौगुले, गावप्रमुख दीपक रेडेकर आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.