करेक्ट कार्यक्रम!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:12 Minute, 11 Second

करेक्ट कार्यक्रम!
——
मिडीया कंट्रोल, वृत्तसेवा
दिनांक,३ मे :
मानवी जीवनामध्ये’ शब्द’ही अतिशय
जहाल असतात.
काळजा वरती घाव घालणारे असतात.
शस्त्राने शरीर जखमी झालेले,शस्त्रक्रिया करून दुरुस्त करता येते,ही जखम देखील वाळते. मात्र,शब्दाने केलेली मनावर ची जखम,
वर्मी बसलेला घाव,मानवी मनाला आत्म शोध,आत्मचिंतन करणेस भाग पाडतो. पैशाच्या लाख मोलाच्या किमतीपेक्षा,
‘शब्द’ ही अधिक धारदार व वारकरी असतात.

2014 च्या तत्कालीन फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले,माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते श्री, देवेंद्रजी फडणवीस, यांनी 2019 ला,
मी पुन्हा येणार म्हणत,भारतीय जनता पार्टीचे युती असलेले सरकार सत्तेत येण्याचे संकेत दिले होते.अगदी वाटचाल अशाच पद्धतीने सुरू होती.
मात्र,अवेळी” 80 वर्षाचा पाऊस”जोरदार बरसल्याने
मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन!
या वाक्याचा पुनरुच्चार करणारे
श्री देवेंद्रजी फडणवीस,यांच्या शब्द प्रयोगाचे हसे होऊन गेले.
कॉमेडी वीर भाऊ कदम यांच्यासारख,
मी पुन्हा येईन!
या शब्दप्रयोगाचा ची कॉमेडी झाली.
अर्थातच श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा सर्व राग,भारतीय जनता पार्टीच्या संघ प्रिय बंधनाचे मुळे,आळवला.

श्री.फडणवीस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला मुख्यमंत्री म्हणून लाभलेले तरुण वयाचे,
हुशार, बुद्धिप्रामाण्यवादी चौकस वृत्तीचे, नागपूर येथील लॉ कॉलेजमधून,कायद्याची पदवी घेतलेले,नागपूर येथील महानगरपालिके पासून ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत चा, त्यांचा असणारा एकूणच सारा प्रवास, लक्षवेधी नक्कीच आहे.
मोठ्या पदावर ती असणारी व्यक्ती कधीकधी गाफील राहते,आणि आपल्याच भ्रमात असल्याने,श्री फडणवीस यांना ऐनवेळी दगा फटका बसला होता.
त्रिशंकू सरकार सत्तेत आल्याने ऐनवेळी, फडणवीस यांच्या तोंडातील दुसऱ्यांदा पडणारा मुख्यमंत्रिपदाचा घास,सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताटात पडल्याने, 80 वर्षाचा जोरदार पाऊस, श्री फडणवीस यांचा “करेक्ट कार्यक्रम” करून गेला.

आज “करेक्ट कार्यक्रम “शब्दाची,
उपरती श्री फडणवीस यांना,झाले असून
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित उमेदवार श्री. समाधान आवताडे, यांच्या विजयामुळे न राहून बोलून दाखवायची वेळ आली.2019 च्या नंतर चा एकेकाचा हिशेब चुकता करण्याची वेळ,नजीकच्या काळात आलेली आहे अशा पद्धतीचे सूचक वक्तव्य श्री फडणवीस यांनी,
योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम करू!असे सूचक विधान करून काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

याच बरोबर त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट खास नमूद केली, हे म्हणजे या देशात काँग्रेसला आता “आरसा” नाही, हे देशभरातील विविध झालेल्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे.
वस्तुस्थिती ही खरी असली तरी,महाराष्ट्रात केंद्रीय स्तरावरून सरकार पाडण्याच्या हालचाली ला जोरदार वेग आला आहे,
याची कुणकुण,श्री. फडणवीस यांच्या सूचक वक्तव्यातून जाणवत असल्याचे दिसून येते.

नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने.
———————————————————-
विद्यमान ठाकरे सरकारमधील त्रिशंकू,व घटक पक्ष असलेल्या,सरकारमध्ये सामील झालेल्या, मंत्रिमंडळातील काही, नेहमीचे सप्तरंगी मंत्री असणारे, पश्चिम महाराष्ट्रातील काही मंत्री वगळता,मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री धास्तावलेले आहेत.
मुख्यमंत्री श्री ठाकरे यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर, राज्य सरकारचे समोर covid-19 या राष्ट्रीय महामारी ने, प्रचंड मोठे संकट उभा केल्याने, राज्य सरकारच्या, मंत्रिमंडळातील राज्य व कॅबिनेट मंत्री, पूर्णता धास्तावलेले आहेत.

गेल्या दीड वर्षांमध्ये, विकास कामांच्या नावाने, जनमाणसांचे मध्ये प्रचंड प्रमाणात निराशा पसरले असून, विकासकामांचे साठी असणारे सरकारचे प्रायोजित निधी कार्यक्रम,सध्या फक्त आरोग्य विभागासाठी राबवताना दिसून येत आहेत.
त्यातच उद्योग व्यापार व वृद्धी, याच्या विकास गावांना खूप असल्याने, महामारी नि व्यापक स्वरूप धारण केल्याने, प्रशासकीय पातळीवर अति कामकाज करणे व चालवणे, याकरता ठाकरे सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सरकारचे प्रतिनिधित्व करत असताना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगला सोडून बाहेर येत नाहीत असा आरोप,अनेक वेळा विरोधी पक्ष नेत्यांनी केलेला आहे.
तर मंत्रालयाचे नियोजन व नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत आहेत,अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी नुकतीच पंढरपूर येथे प्रचाराची दरम्यान केली होती.

सत्तेत येण्यापूर्वीच, तत्कालीन युती सरकारच्या घटक पक्षाचे प्रमुख म्हणून विद्यमान मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी दिलेली तत्कालीन आश्वासने,श्री.ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील,त्यांना पूर्ण करता येत नाही.
ही बाब आता लपून राहिलेली नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला विषयी,
विक्री विषयी,महिला बचत गटाच्या हाताला मिळणाऱ्या दैनंदिनी रोजगार विषयी, वाढत चाललेल्या शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा विषयी, पदवीच्या अनेक, पिशवी घरातील खुंटी वरती टांगून रिकामे फिरत असलेल्या, त्या बेरोजगार तरुण व तरुणी यांच्या विषयी सरकारचे,आजतागायत शब्द निशब्द राहिलेले आहेत.

या सर्वांचा राग नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये, मतदार संघातील तरुण वर्गाने, प्रचंड प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आपले मतदान करून,
राष्ट्रवादीचा” बल्ल्या” उडवून टाकला आहे.

सत्तेच्या विरोधी बाकावर असताना नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये रात्रीच्या 11 वाजेपर्यंत, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न समस्या, सत्ताधारी फडणवीस मंत्रिमंडळासमोर मांडणारे, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, सध्या कमी बोलून,सत्तेच्या साठमारीत मध्ये वेळ मारून नेत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास येत आहेत.

सरकार मध्ये सत्तेत असताना प्रतिनिधित्व करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी, मधील माजी गृहमंत्री, अनिल देशमुख यांच्या वरती 100 कोटीच्या आरोपाची फैरी झडत असताना, तोंडावरती चुप्पी साधून होते.
सरकार दोषा रूपाच्या,गदारोळात सापडलेली असताना,योग्य तो खुलासा सरकारच्या वतीने श्री.अजित पवार यांनी करावयास हवा होता,
मात्र भ्रष्टाचाराच्या विषयी आरोप झाल्यानंतर, श्री.पवार यांनी नेहमीप्रमाणे,टाळण्याचा प्रयत्न केला होता.

श्री पवार हे महाराष्ट्राची मिनी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व गेले अनेक वर्षे करीत आहेत. जलसंपदा विभागातील 72 हजार कोटींचा घोळ झाल्याचा ठपका,असल्याचा आरोप, तत्कालीन जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांनी केला होता.
चौकशीअंती काही अंशी त्यांना क्लीन चिट देण्यात आल्याचे,सांगितले गेले,मात्र वस्तुस्थिती वास्तव,अजूनही जनते समोर आलेले नाही.

देशभरातील काँग्रेस व काँग्रेस मधूनच उठून दुसरा पक्ष निर्माण झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,यांच्यातील भ्रष्ट समान कार्यक्रमाला कंटाळून, 2014 ला या देशातील जनतेने भारतीय जनता पार्टीला एक मुखी एक हाती सत्ता दिली होती.मात्र,महाराष्ट्रामध्ये,
ऐनवेळी ऐंशी वर्षाचा पाऊस पाऊस,बरसल्याने,
श्री फडणवीस यांच्या हातात तोंडातील आलेला मुख्यमंत्रीपदाचा घास काढून घेऊन,
2014 च्या मंत्रिमंडळातील सरकार पैकी
घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे
पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला.

याचा वचपा,काढावयाची वाट, श्री.फडणवीस,गेले दीड वर्षे,पायाला भिंगरी बांधून विविध प्रश्नावर ती,सडेतोडपणे हल्लाबोल करत आहेत.राजकारणात कायमस्वरूपी कोणतीही गोष्ट नसते याचे भान असणारे श्री.फडणवीस यांनी,काल पंढरपूर येथील विधानसभा मतदार संघाचा निकाल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या बाजूने लागल्यानंतर अखेर विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री,
श्री देवेंद्र फडणवीस यांनी मोकळा श्वास सोडला!
योग्यवेळी,”करेक्ट कार्यक्रम करू”!
असा दम देत राज्य सरकारला!

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *