Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रागतिक महाराष्ट्राचा संकल्प घेणारी भव्य संकल्प सभा आज प्रचंड जनसमूहाच्या उपस्थितीत कोल्हापूरमधील तपोवन मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा १४ हजार किमीचा प्रवास करत २४० विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत कागल विधानसभा मतदारसंघात आली आणि तेथे परिवार संवाद दौऱ्याचा समारोप झाला. या दौऱ्याची सांगता भव्य अशा संकल्प सभेने आज झाली.
शरद पवार यांनी सभेला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी ही संकल्पना यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. जवळपास गेले वर्षभर अनेक संकटे असताना सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तालुक्यामध्ये जाऊन जयंतराव पाटील यांनी सर्व घटकांना, विभागांना एकत्र घेऊन प्रचंड दौरा केला. कार्यकर्त्यांशी, लोकांशी संवाद साधला, लोकांचे प्रश्न जाणून घेतले, राज्य सरकारमार्फत त्या प्रश्नांवर काम केले, असे पवार साहेब म्हणाले.एका संघर्षाच्या काळातून आपण सध्या जात आहोत. हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान समोर आहे. आज परिवार संवाद दौऱ्याच्या समारोपाच्या निमित्ताने आपण येथे जमलो आहोत. हा संवाद येथे थांबवायचा नाही, तर पुढेही सुरु ठेवायचा आहे. आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्या सांप्रदायिक विचाराला खड्यासारखे बाजूला करायचे आहे. देशाला एकसंध ठेवायचे आहे. नव्या पिढीची बेरोजगारी घालवायची आहे. महागाईच्या संकटातून सामान्य माणसाला बाहेर काढायचे आहे. कष्टकरी शेतकऱ्याला सन्मानाने जगवायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही एक जबाबदारी म्हणून शीरावर घेतली आहे. या कामात राष्ट्रवादी परिवाराची साथ मिळेल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
एका संघर्षाच्या काळातून आपण सध्या जात आहोत. हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान समोर आहे. आज परिवार संवाद दौऱ्याच्या समारोपाच्या निमित्ताने आपण येथे जमलो आहोत. हा संवाद येथे थांबवायचा नाही, तर पुढेही सुरु ठेवायचा आहे. आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्या सांप्रदायिक विचाराला खड्यासारखे बाजूला करायचे आहे. देशाला एकसंध ठेवायचे आहे. नव्या पिढीची बेरोजगारी घालवायची आहे. महागाईच्या संकटातून सामान्य माणसाला बाहेर काढायचे आहे. कष्टकरी शेतकऱ्याला सन्मानाने जगवायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही एक जबाबदारी म्हणून शीरावर घेतली आहे. या कामात राष्ट्रवादी परिवाराची साथ मिळेल, अशी अपेक्षा पवार साहेबांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेबाबत बोलत असताना प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात असे एकही गाव नाही जिथे आदरणीय पवार साहेबांना मानणारा वर्ग नाही. या यात्रेतून तीन लाखांहून अधिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
पुढे ते म्हणाले की, ज्यावेळी धर्मांध शक्ती राज्य करायला लागतात, तेव्हा देश कसा रसातळाला जातो, हे आज आपण पाकिस्तानमध्ये पाहत आहोत. कुठे पाकिस्तान आणि कुठे सर्वधर्म समभाव असणारा आपला देश… जातीयवादी शक्तींना बाजूला ठेवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, असे आवाहन ना. जयंत पाटील यांनी केले. द्वेषाचे राजकारण आपल्या देशात सुरू होऊ नये, यासाठी आपल्या सर्वांना आपली वज्रमूठ एक केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेने जाणारा महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि तो महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, असे प्रतिपादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी पिढी पुढे आणण्याची जबाबदारी आमची आहे. सर्वांना एकत्र धरून सर्वसमावेशक धोरणाने पुढे जायचं आहे, असा निर्धार आज संकल्प सभेच्या निमित्ताने करूया, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेने जाणारा महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि तो महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, असे प्रतिपादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी पिढी पुढे आणण्याची जबाबदारी आमची आहे. सर्वांना एकत्र धरून सर्वसमावेशक धोरणाने पुढे जायचं आहे, असा निर्धार आज संकल्प सभेच्या निमित्ताने करूया, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले की, ” विरोधकांनी टाकलेले जाळे आणि त्यांनी चालविलेल्या अपप्रचारात न अडकता आपण केवळ विकासाचा अजेंडा कायम ठेवला पाहीजे, याची खूणगाठ कार्यकर्त्यांनी बांधून घ्यावी.” ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. चांगले वकील सुप्रीम कोर्टात देत आहे. तरीही न्यायालय सर्वोच्च आहे, जर का उद्या वेगळा निर्णय आला तर निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच कामाला लागा, गाफिल राहू नका, असे आवाहन अजितदादांनी केले.
“आज आपल्याकडे फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आहेत. आज या कोल्हापूरच्या पवित्र भूमितून आपण राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष बनण्याचा निर्धार करुया”, असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहील्यानंतर म्हटले होते की ज्यांच्या हातात सत्ता जाईल त्यांच्यावर संविधानाचे भवितव्य अवलंबून असेल. सध्याचे केंद्रातील राज्यकर्ते हे संविधानाची पायमल्ली करताना दिसत आहेत, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी केली. भारतात दंगे भडकावण्याचे काम सुरु आहे. तिकडे दिल्लीत गरीबांच्या घरावर बुलडोझर चालवला गेला. दोन धर्मांमध्ये जाणूनबुजून वाद निर्माण केला जात आहे. भाजपा ही भारत जलाओ पार्टी आहे, अशी जोरदार टीका मा. भुजबळ यांनी केली.
“छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यभूमीत या परिवार संवाद यात्रेचा समारोप होतोय याचा आनंद आहे. २०२४ च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष बनवण्याचा संकल्प आज या सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण करूया”, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले.
“आज प्रतिक्रियावादी राजकारण सुरु आहे. माध्यमातले पत्रकार हे मागील काही काळापासून ते नेते अमुक तमुक बोलले त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असे विचारतात. मला वाटतं, हे प्रतिक्रियावादी राजकारण देशाला पुढे कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी शाश्वत राजकारणाची गरज आहे”, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप करत असाल तर मग एका प्रश्नाचे उत्तर द्या. आदरणीय पवार साहेबांनी ५५ वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले राजकारण केले. अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन सत्ता चालवली, याचे स्मरण सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी करून दिले.
तसेच मुंडे पुढे म्हणाले की, “या करवीर नगरीतून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुरोगामी महाराष्ट्राचा संकल्प आम्ही सोडत आहोत. एकदा का करवीर नगरीतून एखादा संकल्प घेतला की तो पूर्णत्वास जातो, हा इतिहास आहे. २०२४ साली विधानसभा निवडणुका होतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री राज्यात होईल, असा संकल्प आज करुया.”
“आज देशात महागाई वाढत आहे. त्याच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी कुठे भोंगे वाजवले जात आहेत, कुठे भलतेच विषय काढले जात आहेत. महागाईच्या विरोधात आपण सातत्याने आवाज उठवत राहिला पाहीजे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची गरज आहे”, असे आवाहन माजी मंत्री, ज्येष्ठ नेते मा. एकनाथ खडसे यांनी केले.
या सभेला खासदार सुप्रियताई सुळे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनिल तटकरे, खासदार फौजिया खान, खासदार श्रीनिवास पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.