Pune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 3 Second

विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांची माहिती; सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू, आजही अतिवृष्टीचा इशारा

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात 11, कोल्हापूर 2, पुणे 6, सातारा 7, सोलापूर 1 असे एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे.तसेच आजही साताऱ्यातील दोन कोल्हापूरातील 5 तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पुणे विभागात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. सांगलीमध्ये 225, सातारा इथे 180, पुण्यात 168, कोल्हापूरमध्ये 123, सोलापूर 78 टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण, ओढे-नाले, नद्या, तळी आदी तुडुंब भरले आहे. यातच धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर भागात अधिक प्रमाणात महापूर आला आहे. यावेळी एनडीएफचे जवान, खासगी संस्था, कार्यकर्ते, आदी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवत आहेत.

सांगलीत 80319 कुटुंब स्थलांतरित, 94 केंद्रात त्याची व्यवस्था करण्यात आली. तर, कोल्हापूरमध्ये 97102 कुटुंबाचे स्थलांतर करून 154 निवारा केंद्रात आणि साताऱ्यात 7085 कुटुंबाचे स्थलांतर करून 17 निवारा केंद्र उभारली आहेत. आतापर्यंत संपूर्ण पुणे विभागात सुमारे 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित केले असून सुमारे 330 निवारा केंद्रात लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या पावसामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक संपर्क तुटला आहे. मोबाईल, टेलिफोन यंत्रणा बंद पडली आहे. वीजपुरवठाही बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प आहे. कोल्हापूर गावांचा येथील सुमारे 390 गावांच्या पाणीपुवठा बंद झाला आहे. तर, सातारामध्ये 91 गावांचा पाणीपुरवठा बंद असून त्या पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

तसेच याठिकाणी वैद्यकीय पथक काम करत आहेत. अशावेळी नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू
सांगलीत पलूस भागात ग्रामपंचायतची बोट उलटून सुमारे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बोट खासगी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, यात सुमारे 20 जण वाहून क्षमता होती. मात्र, यात 30 हुन अधिक नागरिक बसल्याने बोट पलटी झाली. यात काहीच मृत्यू झाला असून काहीजण अदयाप बेपत्ता आहेत. आतापर्यंत 9 मृतदेह सापडले आहेत.तर, चार ते पाच व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *