Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.११ : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १२४.१७२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव व सरुड पाटणे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव व खोची, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड व ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड असे ३९ बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ५०.३७ दलघमी, वारणा ४९८.४४ दलघमी, दूधगंगा ३११.८० दलघमी, कासारी ४७.८४ दलघमी, कडवी ३७.८५ दलघमी, कुंभी ४२.४० दलघमी, पाटगाव ५५.९१ दलघमी, चिकोत्रा २२.९३ दलघमी, चित्री २३.९९ दलघमी, जंगमहट्टी १८.५० दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, आंबेआहोळ २२.२५, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ३२.०८ फूट, सुर्वे ३१.०७ फूट, रुई ६१.०६ फूट, इचलकरंजी ५८ फूट, तेरवाड ५१.०६ फूट, शिरोळ ४२ फूट, नृसिंहवाडी ४० फूट, राजापूर २९.०३ फूट तर नजीकच्या सांगली १२ फूट व अंकली १७.०५ फूट अशी आहे.