राजाराम बंधारा पाणी पातळी सकाळी ९ वाजता ३६ फुटांवर… राधानगरीचे दरवाजे उघडणार… कोल्हापूर वर पुराचे सावट..!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 49 Second

कोल्हापूर : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना कोल्हापुरातही पाऊसाची संतधार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. सकाळी ८:०० वाजता पंचगंगा पाणी पातळी ३६ फूट ७ इंचावर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात एकूण ७३ बंधारे पाण्याखालील गेले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३% भरला असून धरणांतून १६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनही अलर्ट झाली आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने राधानगरी धरणात मोठ्या प्रमाणत पाण्याची आवक सुरू असल्याने धरण १०० % भरल्यास आज दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *