Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
एकीकडे अमल महाडिक आणि महाडिक समर्थक
दुसरीकडे आमदार ऋतुराज पाटील आणि पाटील समर्थक
अन् मध्यभागी डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक….
दोन गट आमने सामने येण्याची चिन्हे दिसत असतानाच योग्य वेळी पोलिसांनी नाका बंदी लाऊन मोठा अनर्थ घडू दिला नाही. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकी मध्ये दोन राजकिय घराण्यांमधील संघर्ष टोकाला जाऊन पोहचला आहे.
प्रचार शुभारंभ प्रसंगी सकाळी अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना बिंदू चौकात येण्याचे आवाहन दिले.दिवसभर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या अन् सायंकाळी पाटील गटाकडून पोस्ट पडू लागल्या की आमचा वाघ ऋतुराज पाटील येत आहे बिंदू चौकात. दोन्ही गटाकडून अशा पोस्ट पडल्या नंतर कोल्हापूर जिल्ह्यात एक संघर्षाचे वातावरण तयार झाले. पोलिसांनी धाव घेत बिंदू चौकात मोठा बंदोबस्त तैनात केला.
१४ एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्या निमित्त निघालेली मिरवणूक बरोबर ७ च्या दरम्यान बिंदू चौकात येऊन थांबली. अन् कोल्हापूरकरांच्या मनात मोठ्या घटनेचे चाहूल लागली. अचानक एवढा मोठा पोलिस बंदोबस्त पाहून मिरवणुकीमधील भीम अनुयायी विचारत पडले होते. त्यानंतर अचानक पोलिस, कार्यकर्ते, मिडिया वाले यांची धावपळ सुरू झाली आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना काही समजेनासे झाले. पोलिसांनी अतिशय योग्य भूमिका घेत अमल महाडिक यांना बिंदू चौकात येताच अडविले अन् ऋतुराज पाटील आणि त्यांच्या समर्थकांना दसरा चौकात अडविण्यात आले. त्यामूळे मोठा अनर्थ टळला.
अमल महाडिक बिंदू चौकात येताच यावेळी पोलिस कार्यकर्ते यांच्यातील गदारोळा मुळे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सतेज पाटील भ्याले अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अमल महाडिक बिंदू चौकातून बाहेर पडताच.. दुसऱ्या बाजूने ऋतुराज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्ते बिंदू चौकात येण्यासाठी धावपळ करू लागले.पण पोलिसांनी त्यांना दसरा चौकात अडवून ठेवले होते. फक्त काही लोकांना घेऊन आमदार पुढे जातील एवढी भूमिका घेतली.
यानंतर ऋतुराज पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना दसरा चौकात थांबण्याचे आवाहन केले. आणि एकटे बिंदू चौकाकडे जायला निघाले परंतु आमदार ऋतुराज पाटील यांची लोकप्रियता इतकी आहे की बिंदू चौकात खूप जास्त प्रमाणात कार्यकर्ते आधीच येऊन थांबले होते. आमदार बिंदू चौकात येताच जोरदार घोषणाबाजी ने परिसरात तणाव निर्माण झाला होता.पाटील समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी होता.
एक कारखान्याची निवडणुक आणि इतका मोठा संघर्ष संपूर्ण कोल्हापूरने पहिल्यांदा अनुभवला. आगामी लोकसभा विधानसभा, महापालिका निवडणुकीत या संघर्षाची झळ सर्व सामान्य जनतेला किती सोसावी लागणार काय माहिती.
काल घडलेल्या या प्रकारामुळे सर्व स्तरावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नेत्यांनी काळजी घ्यावी आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळावे.एखाद्या सभेत एखाद्या मेळाव्यात आपल्या नेत्याने दिलेले एक स्टेटमेंट कार्यकर्ते खूप मनाला लाऊन उचलून धरतात. त्यातून खूप इर्षा आणि अती उत्साह वाढला जातो. यामधून कार्यकर्त्यांचा बळी जाऊ शकतो.त्यामुळे नेत्यांनी आता भाषण करतांना संघर्षाची मर्यादा ओलांडू नये अशा भावना जनतेमधून येतं आहेत.
येणाऱ्या काळात कोणकोणत्या राजकिय घडामोडींना कोल्हापूरकरांना सामोरे जावं लागणार याची जोरदार चर्चा सर्वत्र सुर आहे.