Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : आज ६ एप्रिल भारतीय जनता पार्टीचा ४० वा स्थापना दिवस. देशामध्ये २ खासदार ते ३०३ खासदार व जगातील सर्वात मोठी पार्टी असा थक्क करणारा प्रवास पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेेला आहे.
पक्षासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे अनेक नेते व जनसेवेचा वारसा जपण्यासाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते अशी वेगळी ओळख भारतीय जनता पार्टीची आहे.
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिना निमित्य प्रदेश स्तरावरून कार्यकर्त्यांना सामाजिक अंतर ठेवत, आरोग्याची काळजी घेत प्रत्येक कार्यकर्त्याने घरावर झेंडा लावणे, एकवेळ उपवास करणे, श्यामा प्रसाद मुखर्जी व दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमा पूजन करणे, सेवा कार्यामध्ये १०% वाढ करणे, कापडी मास्क तयार करणे, पीएम केयर्स फंडच्या माध्यमातून निधी संकलन, प्रत्येक बूथवर ४० लोकांशी फोनद्वारे संपर्क, भाजपाचे होऊन गेलेले आदर्श लोक यांच्यासंदर्भातील पुस्तकांचे वाचन करणे अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा स्थापना दिवस साजरा करण्याच्या सूचना होत्या. जिल्हाध्यक्ष श्री राहूल चिकोडे यांनी या आपत्ती काळात गरीब व गरजू लोकांना फ़ूड पॅकेट वितरण करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ता कसा असावा याचे मार्गदर्शन केले तसेच जे कार्यकर्ते फ़ूड पॅकेट वितरण करत आहेत त्यांनी मास्क, ग्लोज, सॅनीटायझर यांचा वापर करत आपल्या आरोग्याची देखील काळजी करावी असे सांगितले. आज भाजपा जिल्हा कार्यालय बिंदू चौक येथे कार्यालय प्रमुख शंतनू मोहिते यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यालयात पंडीत दिनदयाळ उपाध्याय व श्यामा प्रसाद मुखर्जी तसेच भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वत:च्या घरी भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावला. भारतीय जनता पार्टीच्या ७ मंडलांच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या फूड पॅकेट वितरण व्यवस्थे मध्ये कार्यकर्त्यांनी आज स्वत:च्या घरी बनवलेले जेवण या उपक्रमामध्ये जोडून आपला खारीचा वाटा उचलला.
देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी लढताना प्रत्येकाने स्वच्छता राखत, सामाजिक अंतर ठेवत आपल्या आरोग्याची काळजी घेत देश आणि समाज सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध होवू असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे