Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर: राष्ट्रीय महामार्गावर नुकताच एक भीषण अपघात हा झाला आहे. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली येथे बायपासवर हा अपघात झाला आहे. यामध्ये जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन ५ जण जागीच ठार झाले आहेत.
कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळ असलेल्या सरवडेचे सर्व मृत आहेत. राँग साईडने जाणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि जीपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहे. मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे.तर बोलेरो या गाडीमधील एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरो समोरुन पूर्णपणे ट्रॅक्टरच्या समोरच्या भागात घुसली.
या अपघातात तब्बल ५ जणांचा जागीच मृत्यू हा झाला आहे. या मध्ये ४ महिला आणि एका लहान बालकाचा समावेश होता. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. तर यामध्ये २ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर मिरजपासून सुरु होणार टप्पा मंगळवार १६ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग अपघात