मिडिया कंट्रोल न्यूज नोट
राजकीय वारसदार कोण?
काल भेटलो तेव्हा साहेबांनी विचारल जॅकेट घातलायस नव मी हरकून टुम घराच्या खापरी वर तुळशीचे पान ठेवून कार्य सुरु ….
राजकीय वारसदार म्हणून जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या मुलांचीच जास्त संख्या पुढे येत असल्याचा दिसून येत आहे. सामान्य व सच्चा कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्षे नेत्यांच्या बरोबर सावलीसारखी फिरणारे कार्यकर्त्यावर मात्र अन्याय होत असल्याचे जिल्ह्यात चित्र,
सहसा पाहिलं तर सामान्य व्यक्तीची राजकीय भक्कम परिस्थिती असल्याशिवाय राजकारणात येऊच नये.
आणि एखांदा आपल्या सामाजिक कार्यावर नावलौकिक मिळवून आलाच तर आपल्या वारसासमोर तो टीकू नये असे मतदार संघ शाबूत ठेवून विकास कार्य करत असल्याचे दिसून येत आहे एका लोकप्रिय नेत्याने ऑफ द रेकॉर्ड काही प्रसारमाध्यमच्या प्रतिनिधी समोर आपला राजकीय अनुभव सांगताना खूप कष्ट करावा लागतो पक्षाच्या हाय कमांड चे आदेश काटेकोर पाळावे लागतात, पक्षाने सोपवलेले जबाबदारी पंधरा पंधरा दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर कार्यकर्त्या समवेत त्यांच्यासोबतच राहून काम करावं लागतं लोकप्रतिनिधी महणून मी आमदार मी खासदार मी सरपंच मी नगरसेवक मी कसे हे काम करू असे कुठलेही तमा न बाळगता कार्य करावा लागतो.
त्यामध्येही जेष्ठ नेते वरिष्ठ कमांडकडून चाणाक्षपणे आमच्यावर लक्ष असते वरिष्ठांची भेट झाल्यास आमच्या कामावर स्तुती करून आम्ही करत असलेल्या विकास कामाचे आढावा घेत काही क्षण आम्हाला प्रत्यक्षात आठवण करून देताना एवढी वरिष्ठ मोठी व्यक्ती आमच्या कामाबद्दल कार्याबद्दल रेकॉर्ड सांगताना आम्हाला आश्चर्यचकित झाल्या शिवाय राहात नाही.
एवढे प्रचंड मेहनत देशाचे राज्याचे जिल्ह्याचे सामान्य व्यक्तींच्या व्यथा जाणून घेऊन कार्य करताना आम्हाला देखील कसरत करावा लागतो.
याचीच जाणीव ठेवून आपला राजकीय वारसदार म्हणून आपल्या मुलांना पाच दहा वर्ष उशिरा राजकीय क्षेत्रात प्रवेश असली तरी मुलांना जास्त मेहनत घ्यावा लागणार हे लक्षात घेऊन त्यांना आत्तापासूनच स्वतःची क्रेज / ओळख व समाज सेवक म्हणून आवड निर्माण करून लोकप्रियता मिळवण्यासाठी सामाजिक कार्यक्रमस्थळी हजरी लावण्यात जास्तीत जास्त ठिकाणी प्राधान्य दिले जात आहे.
यामध्ये राजकीय नेत्यांचे मुले देखील
“हम भी कुछ कम नही” म्हणत कोणत्या कार्यक्रमाला हजर राहावे कोणत्या कार्यक्रमाला हजर राहू नये.
याची स्वातंत्र्य यंत्रने मार्फत माहिती घेऊन स्वतःची वेगळी विश्व निर्माण करण्याकडे तयारी आहे.
असे असले तरी राजकीय क्षेत्रात स्थान भक्कम पणे निर्माण करण्यासाठी सच्चा कार्यकर्त्याची सोबत असण्याची फार जरुरीची आहे
समाज प्रिय होण्यासाठी जवळच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची अनुवंशिक गुण असणे फार महत्त्वाचे आहे.
राजकीय वारसदार पिढीने समाज कार्यातून सर्व सामान्य जनतेला खूप काही आम्ही देऊ शकतो हे गृहीत धरून आपल्या जवळच्या सच्चा कार्यकर्त्यांसाठी अन्याय न करता किमान महिन्यातून एकदा तरी त्यांची अपेक्षा काय आहे माझ्याकडून काय हव मन मोकळेपणाची बैठक घ्यायला पाहिजे तरच पुढील भविष्य उज्वल होईल.
प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात पालक विचारतात.
साहेबांनी सगळं मिळवलं साहेबांच्या मुलांनी सगळं मिळवल तू काय मिळवल ?..
आपल्या नेत्यावर दृढ आत्मविश्वास आशावादी ध्येय आणि इच्छाशक्ती असल्याने, त्याला उत्तर – गप बसा वो /गप ग साहेबांची बारीक आपल्या कडे लक्ष हाय!
काल भेटलो तेव्हा साहेबांनी विचारल जॅकेट घातलायस नव मी हरकून टुम घराच्या खापरी वर तुळशीचे पान ठेवून कार्य सुरु ….