Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर शहराच्या छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या शिवस्मारकाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया आहे.
लॉर्ड विल्सन यांच्या पूर्णाकृती संगम्रवरी पुतळ्यावर डांबर ओतून हातोड्याचे घाव घालून तो विद्रूप केला त्यामुळे तो हटवण्यात आला या पुतळ्याच्या ठिकाणीच रयतेचा राजा शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्यात आले.
हिंदुपदपादशाह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोल्हापुरातील भव्य पुतळाची संकल्पना भालजी पेंढारकर व कलामहर्षी बाबुराव पेंटर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 18 दिवसात शिवस्मारकाची निर्मिती करून करण्यात आले होते आणि ही गोष्ट कोल्हापूरला अभिमानाची आणि कलेच्या इतिहासात अजरामर ठरणारी आहे .
कोल्हापुरात आजच्या दिवशी ७५ वर्षांपूर्वी म्हणजेच १३ मे १९४५ रोजी फेरीस मार्केट (सध्याचे छत्रपती शिवाजी मार्केट) चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन सोहळा झाला होता. आज या ऐतिहासिक सोहळ्याला अमृतमहोत्सव यानिमित्त कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून ध्येयमंत्र ,प्रेरणामंत्र याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले , अभिवादन करत असताना हिंदुत्ववादी संघटनेचे संभाजीराव उर्फ बंडा साळुंखे ,पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील ,नेशन फर्स्ट चे अवधूत भाटे, नितेश कोकितकर, रोहित माने, राकेश शिंदे, विराज पाटील, प्रताप कुंभार, सनी पाटील ,राजू कोकितकर, सनी पेंडकर, प्रसाद मोरे, अथर्व बकरे, ऋषिकेश कोकितकर
उपस्थित हाेते.