Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरिबांना ५ रू मध्ये शिव – भोजन थाळी दिली जाते.दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या श्रमिकांना शिवभोजन थाळी आधारवड आहे, असे मत आम.ऋतुराज पाटील यांनी केले.
हॉटेल सैराट येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीरच्या तहसिलदार सौ.शितल मुळे-भांबरे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुरवठा अमलदार मा.श्री दत्ताञय पाडळकर, पुरवठा इन्स्पेक्टर श्री लक्ष्मिकांत पाटील, मुडशिंगी सर्कल,मा.श्री सतिश चव्हाण , हॉटेलच्या व्यव – स्थापिका सौ.सारिका शेळके ,कृष्णात शेळके, मा. श्री प्रदिप झांबरे माजी सभापती पं.स.करवीर मा.श्री विजय पाटील,को.दक्षिणचे ग्रामीण संपर्क प्रमुख श्री बजरंग रणदीवे,राजगोंडा वळिवडे , चंद्रकांत पाटील ,प्रल्हाद शिरोटे, गणपती जाधव बापू, डॉ. अरविंद मोहिते,बाबा सरकार,राजेश तांबवे, विकास घागरे, पो.पाटील दिपक पासान्ना,ग्रा. प.डे.सरपंच ,सर्व सदस्य व ना.बंटी प्रेमी ग्रुपचे व आर.पी.ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.