स्थानिक स्वराज्य संस्थां वरील लोकनियुक्त लोकप्रतिनिधी हे सार्वजनिक निधीचे म्हणजेच त्या संस्थेच्या, जनतेकडून जमा झालेल्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाचे विश्वस्त असतात मालक नाही : भा.ज.पा

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:5 Minute, 9 Second

कोल्हापूर ( दिनेश चोरगे ) : कोल्हापूर महानगरपालि – केच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय अंदाज -पत्रकामध्ये महापौर निलोफर आजरेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या  खाजगी जागेवर काम करण्याकरिता रु. ३,००,०००/- इतकी तरतूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एखाद्या महापौरांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या खाजगी जागेतील कामाकरिता सार्वजनिक  निधीची तरतूद करण्याचा हा बहुधा पहिलाच ऐतिहासिक प्रसंग आहे. या अंदाजपत्रकावर, सभेत अंदाजपत्रक मांडले त्याचदिवशी सभेमध्येच मंजुरीची सही करून महापौरांनी दुसरा इतिहास रचला व त्या अंदाजपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

गेल्या पाच वर्षात लोकहिताचा कोणताही जुना अथवा नवा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. गतवर्षीचा महापूर आणि यावर्षीचा कोरोना लॉक डाऊन यामुळे महानगरपालिकेचे उत्पन्न  मोठ्या प्रमाणावर घटले आहे.  त्यातच  महानगरपालिका  क्षेत्रांमध्ये  अलगीकरण कक्ष चालवण्याच्या खर्चाचा बोजा  महानगरपालिकेवर पडत आहे.  असे असताना जनहिताच्या कामांकडे  दुर्लक्ष होईल अशा पद्धतीने सहित्याची कामे करणे  हे  निंदनीय आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थां वरील  लोकनियुक्त लोकप्रतिनिधी हे सार्वजनिक निधीचे म्हणजेच त्या संस्थेच्या, जनतेकडून जमा झालेल्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाचे विश्वस्त असतात मालक नाही हे महापौर विसरल्या आहेत. एखाद्या विश्वस्तांने त्यातही महापौरांच्या सारख्या पदाधिकाऱ्याने सार्वजनिक निधीचा वापर खाजगी कामासाठी करणे हे निषेधार्ह आहे.

जनतेच्या पैशाचा असा गैरवापर विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या महापौरांना शोभत नाही. विश्वस्तांनी अशाप्रकारे जनतेचा विश्वासघातच केला आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु इतक्या उघडपणे जनतेचा विश्वासघात करूनही आज अखेर महापौरांनी राजीनामा दिला नाही अथवा त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही. याचा अर्थ महापौर आपल्या गैर कृत्याचे समर्थन करतात व त्यांचे वरिष्ठ त्यांना पाठीशी घालतात असा होतो. महापौर पदावर असणाऱ्या व्यक्तीने जनतेशी विश्वासघात करणे हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कर्मभूमी मध्ये त्यांच्या विचारांचा अपमान आहे. त्यामुळे येत्या सात दिवसात महापौरांनी आपला राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी त्यांच्या राजीनाम्यासाठी उग्र आंदोलन करेल. असा इशारा भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषदेत दिला.

महापौरांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खाजगी जागेतील कामासाठी सार्वजनिक निधीचा वापर करणे, हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या विरोधातील कृत्य आहे. महापौरांनी अशाप्रकारे बेकायदेशीर काम केल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका आधीनियमा नुसार त्यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरवण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही सुद्धा भारतीय जनता पार्टी ने सुरू केली आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, गटनेते अजित ठाणेकर, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, विजय खाडे आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी या विषयातील पक्षाची भूमिका सविस्तर मांडली व गटनेते अजित ठाणेकर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली .

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *