मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये मॉल्स, मार्केट, दुकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहणार आहेत.
जिल्हांतर्गत ५० टक्के प्रवासी क्षमतेसह बससेवा सुरु राहील हेल्मेट व मास्क वापरासह दुचाकीवर दोघांना, तीनचाकीत चालकासह तीन तर चारचाकीत चालकासह चौघांना सूट देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिला.
प्रतिबंधीत / बंद क्षेत्रे खालील प्रमाणे असतील
१ .कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमा बंदी आदेशाच्या कालावधीत बंद राहतील व या कालावधीत आंतरजिल्हा माल वाहतूक, जीवनावश्यक सेवा / सुविधा व अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक व जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतुक वगळून उर्वरीत सर्व वाहतूक प्रतिबंधीत असेल.
२. शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण / शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधीत असतील.
३. एमएचए ने परवानगी दिलेल्या व्यतीरिक्त आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक.
४. मेट्रो रेल.
५. रेल्वे व देशांतर्गत होणारी हवाई प्रवासी वाहतूक स्वतंत्र आदेशाद्वारे आणि एसओपी नुसार परवानगी घेतलेले वगळून.
६. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस्, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, असेंब्ली हॉल या सारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधीत असतील.
७. सर्व सामाजिक / राजकीय / क्रिडा / करमणूक / शैक्षणीक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधीत असतील.
८. धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणची उपासनास्थळे.
९. सर्व प्रकारचे बंदीस्त हॉल किंवा खोलीतील खेळ, जिमनॅशियम्स इ.
१०. जीवनावश्यक वस्तू व आरोग्याची कारणे वगळून ६५ वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रीया व दहा वर्षा खालील मुले यांना घराबाहेर पडणे प्रतिबंधीत असेल.
११. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु वगळून सर्व मार्केट व दुकाने सकाळी ९ पूर्वी व सायंकाळी ७ नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असलेचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करणेचे आदेश देणेत येतील.
१२. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, सुपारी खाणे व थूकणे प्रतिबंधीत आसेल.
१३. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही करणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक २९जुलै २०२० रोजीच्या आदेशाच्या कलम ८ मध्ये नमूद नसलेल्या सर्व बाबी आणि ज्या प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या नसतील त्या सर्व बाबी प्रतिबंधीत नसलेल्या क्षेत्रामध्ये खालील अटीच्या आधारे सुरू असणेस परवानगी असेल.
१) यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या सर्व आस्थापना पूर्वी प्रमाणे सुरु राहतील.
२) जिल्हा अंतर्गत बस सेवा हि जास्तीत जास्त ५०% प्रवासी क्षमतेसह त्याचबरोबर बसमध्ये शारीरिक अंतर आणि स्वच्छताविषयक उपाययोजनेसह सुरू करता येईल. प्रत्येक बस प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावी लागेल. त्याच प्रमाणे मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. वाहनात बसताना सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल
३) मॉल्स आणि मार्केट/दुकाने सकाळी ९ वा. ते सायंकाळी ७ वा. पर्यंत दिनांक ५ ऑगस्ट २०२० पासून सुरु राहतील. मार्केट मधील चित्रपटगृहे बंद राहतील. फुडकोर्टस व रेस्टॉरंटस यांना फक्त पार्सल सुविधा देता येईल.
४) खुल्या जागेतील सांघिक नसणारे खेळ जसे गोल्फ कोर्स, खुले फायरिंग रेंज, जिम्नॅस्टीकस, टेनिस, खुल्या जागेतील बॅडमिंग्टन आणि मल्लखांब हे खेळ, योग्य ते शारिरीक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळून दिनांक ५ ऑगस्ट पासून सुरु करता येतील. जलतरण तलाव सुरु करणेस प्रतिबंध असेल.
५) खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त ५० नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहण्यास जिल्हाधिकारी यांच्या दि. २३ जून रोजीच्या आदेशात दिले प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
६) केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटीपार्लर्स सुरु करणे संबंधी जिल्हाधिकारी च्यांच्या दि. २६ जून रोजीच्या आदेशात दिले प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
७) शैक्षणिक संस्था (विद्यापीठे / महाविद्यालये / शाळा) यांचे कार्यालय / कर्मचारी केवळ शिक्षणेत्तर कामकाज करु शकतील व यात ई-सामुग्री विकास, उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि निकाल जाहीर करणे, रिसर्च वर्कर्स व सायंटीस्ट या ही कामांचा समावेश असेल.
८) सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक यांना खालीलप्रमाणे प्रवासी संख्येच्या हमीसह वाहतुक व्यवस्थापन करता येईल. परंतु प्रत्येक वापराचे वेळी असे वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवाशी व चालक/वाहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. चालकाने त्यांचे वाहनात निर्जंतुकीकरण उपकरण ठेवणे बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे मास्क न घातलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही.
i. दुचाकी : १+१ हेल्मेट व मास्क वापरणे अनिवार्य.
ii. तीन चाकी: १+२
iii. चार चाकी: १+३
नमुद प्रतिबंधीत बाबी वगळता उर्वरीत सर्व बाबींना मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील दिनांक २९ जुलै २०२० रोजीच्या आदेशामध्ये नमुद प्रतिबंध व सुट लागू असेल.
बंदी आदेशातुन सूट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर इ. बंधने पाळणे आवश्यक आहे.
पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.
कोव्हीड-१९ विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देश
१. सर्व नागरिकांना सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकावयाचे साधन वापरणे बंधनकारक असेल.
२. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकीदरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक असेल. दुकानामध्ये/ दुकान परिसरामध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्ती / गिऱ्हाईक यांना प्रतिबंध असेल तसेच उपस्थित असलेल्या व्यक्ती / गिऱ्हाईकां मध्ये ६ फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल.
३. विवाह कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त ५० नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल.
४. अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त २० नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल.
५. राज्य तसेच स्थानिक प्राधिकरणाव्दारे करणेत आलेल्या नियमानूसार तसेच कायद्यामध्ये नमूद असलेल्या तरतूदीनूसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी थुंकणे हे दंडनिय असेल.
६. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थूंकण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त दिशानिर्देश
७. शक्यतोवर काम हे घरातून करणे विषयीची बाब पाळणेत यावी.
८. कार्यालये/ आस्थापनामधील सर्व प्रवेश व बाहेर पडणेच्या ठिकाणी तसेच कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिग/ हॅड वॉश/ सॅनिटायझर हे उपलब्ध करून देणे.
९. कामाच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक वापराचे ठिकाणे तसेच सर्व गोष्टी ज्या मानवी संपर्कामध्ये उदा. दरवाज्याचे हॅण्डल, इत्यादी तसेच सतत हाताळली जाणाऱ्या बाबींची पुन्हा पुन्हा निर्जंतुकीकरण करणे यावे.
१०. कामाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी कामागारामधील पुरेसे अंतर, कामाच्या वेंळादरम्यान पुरेसे अंतर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळामध्ये सामाजिक अंतराचा निकष पाळला जावा.