Getting your Trinity Audio player ready...
|
राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता आलेल्या अहवालानुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ४३ फूट ६ इंच इतकी आहे.
(पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे) तर एकुण ६९ बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.
जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- ३.८८ (३५५.७५ ), शिरोळ- ०.७१ (२८६.२९), पन्हाळा- १६.१४ (९६०.१४ ), शाहूवाडी- १७.३३ (१२०१), राधानगरी- १५.८३ (१३४५.३३), गगनबावडा-६५ (३४७५), करवीर- ९.२७ (७३१.२७ ), कागल- ६.२९ (९४६.७१), गडहिंग्लज- ५ (६४५.२९), भुदरगड- १३.२० (१०४०.६०), आजरा- १८.२५ (१४८६.५०), चंदगड- १०.८३ (१४९६.१७) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.