Getting your Trinity Audio player ready...
|
राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : आज १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०७:०० वाजता आलेल्या अहवालानुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ३८ फूट ९ इंंच इतकी आहे. तर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३फूट आहे) त्याचबरोबर एकुण ९५ बंधारे पाण्याखाली गेलेली आहेत.
राधानगरी धरणाचे ३/५/६/४/ स्वयंचलित दरवाजे उघडले असुन विसर्ग ७११२ क्युसेक आहे.
त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यातील इतर धरणामधून पुढील प्रमाणे विसर्ग चालू आहे.
तुळशी- ८८४ क्युसेक, वारणा-१४४८६ क्युसेक, दुधगंगा- १२९५० क्युसेक, कासारी- १७५० क्युसेक,
कडवी -२५१९क्युसेक, कुंभी – ६५० क्युसेक, पाटगाव – १४६२ चिकोत्रा – ०० चित्री -२००५ क्युसेक, जंगमहट्टि- ६३४क्युसेक, घटप्रभा -२७२४क्युसेक जांबरे-२२६५क्युसेक, कोदे- ८१८ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे.
(१) राजापूर बंधारा पाणी पातळी ४३ फुट ० इंच आहे (धोका पातळी -: ५८ फुट इशारा पातळी-: ५३ फुट आहे. )
( २) नृसिंहवाडी पाणीपातळी सध्या ५० फुट ० इंच आहे (धोका पातळी ६८ फुट इशारा पातळी ६५ फुट आहे.)
(३) शिरोळ पाणीपातळी सध्या ५२’६”फुट आहे (धोका पातळी -: ७८ फुट इशारा पातळी-: ७४ फुट आहे)
(४) इचलकरंजी पाणीपातळी सध्या ६० फुट ६ इंच आहे( धोका पातळी-: ७१ फुट इशारा पातळी-: ६८ फुट आहे. तेरवाड पाणी पातळी सध्या ५५ फुट ० इंच आहे( धोका पातळी -: ७३ फुट इशारा पातळी -: ७१ फुट आहे )
(६) कोयना धरण पाणी पातळी ६५६.४६३ मी
सध्या ९२.७० टि .एम्. सि ( ८८.०८टक्के) आवक ११४९८०, जावक विसर्ग ५६४३१ आहे.
(७) अलमट्टी पाणी पातळी सध्या ५१८.८० मी १०९.७६ टि.एम.सि.आहे तर आवक १२७५८२ व जावक विसर्ग २५०००० असा आहे.