महाविद्यालयीन विद्यार्थींनीचा शेतीविषयक सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे साकार!!.

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 25 Second

Media Control Online

आज समाजातील सर्व तरुण-तरुणी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करत आहेत याचा नक्कीच आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. सर्वांनाच आपला देश धर्म जात पंथ यांचा अभिमान नक्कीच आहे.त्याच धर्तीवर आपल्या भारतातील संस्कृतीत बंजारा, वंजारी समाजाचे योगदान नक्कीच गौरवास्पद आहे. नुकतेच अहमदनगर जिल्हा,

नाशिक, संगमनेर तिगांव पंचक्रोशीतील वंजारी समाजातील मृणाल मिलिंद उगलमुगले (Founder at CtrlAlt-Fix IT Solutions) यांनी संगणक अभियांत्रिकी MGM College of Engineering and Technology, कामोठे, नवी मुंबई येथे शिक्षण घेत असुन त्या भरपूर क्षेत्रात आयटी सर्व्हिसेस देत आहेत. त्यात प्रामख्याने बाहेर देशात म्हणजेच केनिया सारख्या देशांमध्ये सुद्धा आयटी सर्व्हिसेस देत आहेत.हे सगळ करत असताना त्यांची आई सौ. अपर्णा मिलिंद उगलमुगले यांनी मुलींना सेंद्रिय शेतीविषयी सुचवल्यानंतर मृणाल यांनी त्यांच्या दोन मैत्रीणी कु. सिध्दी शरद करंबेळकर व कु. सोनाली भानुदास डोंगरे यांच्याबरोबर मिळून कंपनी स्थापित केली, त्या अंतर्गत त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली.

ही शेती रसायनाचा वापर न करता केवळ शेतांतील पिकांचे अवशेष, शेष, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही केला.. या तिघी मुलीनी मिळून तेथील लोकाना सेंद्रिय शेतीचे महत्व समजावून सांगितले. हया शेतीचे उत्पादन मुंबई, बदलापुर राहटोली या ठिकाणी घेतले जाते. या सेंद्रिय शेती मध्ये मोठ्या प्रमाणात गांडूळखत, शेणखत व कोकोपीट सारखी उत्पादन घेतले जाते. यामध्ये गांडूळखताचे ते ८० ते ९० टन येवढे उत्पादन घेतले जाते. तेथील लोकांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देताना हया तीघी मैत्रिणींनी तेथील शेतकरी मित्र घरच्या घरी बागकाम करणाया गृहिणींना सेंद्रिय खताच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले. उदा. सेंद्रिय शेती पद्धतीनुसार पांरपारिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे, त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे. ज्यामुळे आरोग्यास पोषक असणान्या उत्पादनांची निर्मिती होण्यास मदत होत आहे.त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी जनता आणि समाज बांधव मोठ्या प्रमाणात त्यांना मदत करत आहे आणि प्रोत्साहन देत आहेत.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर वाढता प्रभाव पाहता शेती व्यवसायाकडे होऊ लागलेले दुर्लक्ष,त्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता जनक परिस्थिती आपण अनुभवत आहोत,त्यातच या मुलींनी सेंद्रिय खत व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन आपण कसे घेवू शकतो हे सिद्ध करत शेती व्यःवसायाप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला ही बाब अखंड वंजारी समाज बांधव आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी नक्कीच गौरवास्पद आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *