मी आरोप करायला नाही,तर कोकणाला भरभरुन देण्यासाठी आलोय-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 15 Second

दीपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी 

रायगड: खेड-दापोली येथील गोळीबार मैदानात काल बाळासाहेबांची शिवसेना गटाची विराट सभा झाली. यासभेदरम्यान बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी कोणावरहि टीका टिप्पणी करण्यासाठी कोकणात आलेलो नसून, मी कोकणाला भरभरून देण्यासाठी आलोय.कारण शिवसेना आणि कोकण हे नात बाळासाहेब ठाकरेंपासुन अतूट आहे.जस प्रेम तुम्ही बाळासाहेबंवर केलत तसच प्रेम बाळासाहेबांनी या कोकणावर केल आणि तसच प्रेम आपल सरकार या कोकणावर करणार आहे.आजची विराट सभा पाहुन येणाऱ्या आगामी निवडणुकीत दापोली मतदारसंघातुन योगेश कदम यांचा विजय निश्चित आहे.योगेश कदम हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे त्याला पडण्याची हिंमत कोणाच्यात नाहि मी त्याच्या पाठीशी आहे अस प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केल.

  आम्ही घरात बसुन आदेश देत नाहि,तर जीव धोक्यात घालुन काम करतो.तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता,खोके म्हणता तुमच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही,कारण आरोप करण्यासारख माझ्याकडे खुप आहे पण मी बोलणार नाहि,कारण आम्ही गद्दर नसून खुद्दार आहोत.आज आमच्यासोबत ५० आमदार आणि १३ खासदार आहेत.गद्दारी तुम्ही केलीत २०१९ ला याचा साक्षीदार मी आहे.रामदास कदम,आनंदराव अडसुळ,गजानन कीर्तिकर,दिपक सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून संघटना कमकुवत केलीत.कार्यकर्ता जपला पाहिजे कार्यकर्ता मोठा झाला कि संघटना मोठी होते.सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा बोलवण्यासाठी रामदास भाईने आपली मनधरणी केली असता त्यांना देखील “दरवाजा उघडा आहे तुम्हीपण जा.!असा सल्ला दिलात.दरवाजा असाच उघडा ठेवा म्हणजे आहेत तेपण येतील मग हम दो,हमारे दो म्हणत माझ कुटुंब,माझी जबाबदरी” अस म्हणत बसा असा खोचक टोल यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.

   कोकणात येत्या काळात आपण विविध प्रकल्प,विविध योजना राबवणार आहोत.कोकणच सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय आपल्या सरकारच आहे.तसेच गडकिल्ल्याचे संवर्धन,न्यु मांडवे प्रकल्प,कोकणातील रखडलेले सिंचन प्रकल्पांना गती देणे,खेड नळपाणी योजणेसाठी ४३ कोटीचा निधी मंजूर केलाय,कुणबी भवन,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, हुतात्मा अनंत कन्हेरे,साने गुरुजी स्मारक,मरीन पार्क,क्रिडासंकुलन,अल्पसंख्यांक सामाजिक भवन,हि सर्व कामे मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.मच्छीमार बांधवांना दिलासा देणे,रखडलेला मुंबई-गोवा हायवे डिसेंबर पर्यत पूर्णत्वास नेणे,कोकणात काजु प्रक्रिया केंद्र सुरु करणे जेणेकरून नोकरीच्या शोधात इतरत्र फिरणार्या कोकणातील तरुणाना येथेच रोजगार कसा निर्माण केला जाईल यावर विशेष भर आपल सरकार देईल अस मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *