सांगली प्रतिनिधी शरद गाडे : मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळदार पावसाने कृष्णाकाठ हादरलेला आहे, त्यामुळे महापूर येण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

आज दुपार पर्यंत आयर्विन पूल येथे पाण्याची पातळी चौतीस फुटावर गेली आहे. तसेच विस्तारित महानगरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे.


कर्नाळ रस्त्यावरील आरवाडे प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट येथे पाणी आलेले आहे येथील नागरिकांना महापालिकेच्या सहकार्याने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे.
महापुराच्या उंबरठ्यावर असलेल्या सांगलीत महापालिकेची यंत्रणा सज्ज होऊन काम करत आहे.
